काल फ़िरून येताना गल्लीतली मुले धावत आली. म्हणाली ’काका आमचा पतंग तुमच्या गच्चीत पडला आहे. गच्ची उघडून देता कां?’ मी गच्चीची किल्ली घेऊन त्यांच्याबरोबर वरती गेलो. असे दिसले की सर्वत्र सुकलेल्या पानांचा ढिग झाला आहे. पावसाळ्यात पाणी तुंबायची शक्यता आहे. वाळकी पाने लगेच हलवायला पाहिजेत.
मनात विचार येऊन गेला की या पोरांची मदत मिळाली तर किती बरे होईल? त्यांना काही पैसे पण देता ...