भारतामधले जम्मू आणि कश्मिर हे राज्य, ते भारतात सामील झाल्यापासूनच, सतत वादाच्या भोवर्यात सापडलेले आहे. पूर्वेकडे चीन, उत्तरेकडे अफगाणिस्तान, पश्चिमेला पाकिस्तान अशा आंतर्राष्ट्रीय सीमा असणारे हे राज्य, भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या आधीच, नवनिर्माण पाकिस्तानच्या सेनेने टोळीवाल्यांच्या नावाखाली केलेल्या आक्रमणाला बळी पडले होते. या नंतर हे राज्य, भारतीय संघराज्यात ...