कुसुमाग्रजांची कविता आठवली – एकंच ...
कुसुमाग्रजांची कविता आठवली – एकंच ...
इस्लाम बद्दल जाणून घ्यायची इच्छा अपार. लहानपणापासून वाचले त्याचे इम्प्रेशन मनावर असते आपल्या सगळ्यांच्या… मग ती पाठ्याशाळेतील पुस्तके असो की ऐतिहासिक कादंबऱ्या बखरा असोत. कुठून तरी वायव्येकडच्या वाळवंटातून उंटांचे काफिले प्रवास करत आहे.. बदायुनी लोक रात्री एकत्र बसून शेकोटीभवती गाणी गात आहेत. किंवा मग असंच हिरवा झेंडा घेऊन कोणता तरी घोड्यांचा काफिला आरडा-ओरडा करत आला… ...
मोमीन खान मोमीन साहेबांची उत्कृष्ट गजल…
वो जो हममे तुममे करार था.. तुम्हे याद हो के न याद हो….
वो नये गिले वो शिकायते, वो मजेमजेकी हिकायते…वो हर एक बातपे रूठना… तुम्हे ...
पद्मा गोळे म्हणतात -
कोठेतरी गेलेच पाहिजे गतीचीही आहेच सक्ती
आत्ता बाहेर सोसाट्याचे वादळ आणि पाऊस येत आहे. एक वर्ष तरी झाले मी वादळाची वाट पाहत आहे. मिडवेस्ट मधली राज्ये ही वादळांच्या छायेखाली असतात. सारखे अलर्टस, टोर्नाडो आला की काय करावे, कसे करावे, कुठे लपावे कुठून पळावे, काय करू नये वगैरे वगैरे काय काय चालू असते. आधीच अमेरिकेसारखा देश जिथे उगीच जास्त काळजी करतात. त्यात हा वादळांचा धोका. इथे येण्यापूर्वीपासून इच्छा होती की एकदा तरी मोठा ...
काम करायचा आळस असेल तर ‘विचार चालू आहे’ हे कारण मस्त आहे द्यायला… तो करताना दाखवावा लागत नाही की काही नाही… ब्लॉगचेही तसेच; नव्याने लिहायला सुरु करेन सुरु करेन म्हणतो आहे, पण नुसतेच म्हणतो आहे. कल्पना अशी होती की उधार-उसनवारी खूप झाली. इतरांच्या कविता, दाखले, शेर, इतिहासातल्या कथा, साहित्यातले मासले बरेच काही लिहून लिहून पोस्ट्सचा पाऊस पाडता येईल. आला देखील. ब्लॉग सुरु केलाच ...
पुनरागमन??? मधुशालेमध्ये बच्चनजी म्हणतात – आनेकेही साथ जगतमें कहलाया जानेवाला..
बरेच दिवस गैरहजर राहिल्याबद्दल मुआफी बक्षावी. मध्यंतरीच्या कळत अनेक घटना घडल्या ज्यांना फक्त असंभावित अन अनपेक्षित म्हणू शकतो. खरे तर त्यातल्या प्रत्येक घटनेवर एक एक मस्त आर्टिकल होऊ शकते. एका माणसाला भेटलो. त्याचे जन्मगाव आहे बेथलेहेम. तेच ते गाव जिथे ख्रिस्त जन्माला. आणि ते आहे जेरुसलेम ...
आत्ताच १२ वीचा निकाल लागला. या निकालातली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ‘लातूर Pattern’ साठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याची पहिल्या क्रमांकावरून झालेली उचलबांगडी आणि ती सुद्धा साधीसुधी नाही तर एकदम शेवटच्या स्थानावर. मागच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण होते ८५.५१ % आणि ह्या वेळेस ते आहे ४४.८१ %….!! आता वर्षभरात विद्यार्थ्याची पातळी काही इतकी खालावत नाही. या साठी ...
एक एक फिक्सेशन असते. काही वेळा येते, तेव्हा डोक्यात असे ठाण मांडून बसते की निघता निघत नाही. सध्या उर्दू फिक्सेशन चालू आहे. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी खानाला जसे संताजी धनाजी दिसायाचे तशी माळा उर्दू दिसते आहे पण शत्रू म्हणून नोहे. उलट ‘ये ग ये ग विठाबाई’ च्या आवेशाने मिळेल तसे वाचत सुटलो आहे. पण राहता राहून असे वाटते आहे की ब्लोग्वाचकांवर उर्दूचा अकारण जरा जास्तच भडीमार होतो आहे. ...
रावणाला मारायला राम आला होता. म्हणजे रावणाची योग्यता इतकी होती, शक्ती इतकी होती, आराधना, भक्ती इतकी होती की त्याच्या बरोबरीचा शत्रू म्हणजे राम. यात रावणाचे महानत्व येते. (काही लोक उलटे पाहतात की रावणासारख्या शत्रूला मारले म्हणून राम जास्त मोठा.. म्हणजे रावणाच्या पात्रतेवरून रामाची योग्यता मोजतात) ते काही असो. तुम्ही खूप कष्ट करता, प्रयत्न करता, रिझल्ट्स मिळवता, प्रेझेंट ...