1975 सालात मला युरोपला जाण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. भारत त्यावेळी खादीच्या पडद्याआड लपलेला देश होता. परदेश प्रवास हा त्या वेळी अनावश्यक चैन आराम समजला जात असे. खोट्या समाजवादी कल्पनांच्या बुरख्याआड, डोळे मिटून बसलेल्या शासनाने, बाहेरची कवाडे बंदच करून टाकली होती. युरोपच्या या भेटीमुळे माझे डोळे खरोखरच उघडले. पाश्चिमात्य जगतात लोक रहातात कसे? ते आपले उद्योग धंदे ...