हर्डीकरांनी लेखात सादर केलेला इतिहास हा बव्हंशाने सर्वज्ञात आहे. त्याच ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन लेखकाने मांडलेले विचार आपल्याला याच सिद्धांताकडे घेऊन जातात की ’माणसाच्या मनात धर्मरूढींपेक्षादेखील लोकसंस्कृती अत्यधिक दृढपणे रुजलेली असते आणि माणसाच्या रक्तात धर्मबंधुत्वापेक्षादेखिल भाषाबंधुत्वाचे नाते अत्यंत दाटपणे भिनलेले असते’. हाच सिद्धांत अधोरेखित करण्यासाठी ...
झाशीची राणी लक्ष्मीबाई भारतीयांच्या पराक्रमाचे प्रतीक. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात आघाडीवर असलेल्या लक्ष्मीबाईचा टाइम साप्ताहिकाने गौरव केला आहे, तो जगाच्या इतिहासातील "टॉप टेन' पत्नींच्या यादीत. साहसाचा, पराक्रमाचा आदर्श मानल्या जाणार्या झाशीच्या राणीचा हा उल्लेख तिच्या कारकिर्दीची ...
फाळणीपूर्वीच्या या लाहोरमध्ये कृष्णानगर, संतनगर नावाच्या वस्त्या होत्या. भारत नावाची इमारत होती. गीता नावाचं सभागृह होतं. मोहिनी नावाचा रस्ता होता. सनातन धर्ममंदिर होतं. कपूरथळा, नाभा, पतियाळा संस्थानातील राजेरजवाडय़ांचे बंगले होते. या लाहोरमध्ये गुजराती लॉज नावाची खाणावळ होती आणि तिथे ...
या आधीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यभाषेच्या ऐवजी परराज्याच्या व परदेशाच्या भाषेतूनच चर्चा, निवेदने, पत्रकार परिषदा वगैरे घेत असत. आणि त्यामुळे केवळ महाराष्ट्रीय लोकांनाच स्वभाषा, स्वसंस्कृतीबद्दल अभिमान नाही हे वारंवार अधोरेखित होत असे. इतर ’तथाकथित’ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यमांना व वाहिन्यांना करुणानिधींचे तमिळ वक्तव्य समजते, बुद्धदेबांचे ...
जुनाच असललेला हा कायदा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षा-दोन-वर्षांत अनेकदा यासंबंधी बातम्या विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्या. महाराष्ट्रातील विद्यापीठांत केवळ नामफलक, परिपत्रके, माहितीपुस्तिका एवढ्याच बाबतीत नव्हे तर सर्वच प्रशासकीय बाबींमध्ये राज्यभाषा मराठीला सर्वोच्च स्थान देणे हे कायद्याने अनिवार्य आहे. अध्यापनाच्या मूळ विषयाशी थेट ...