सर्वप्रथम धन्यवाद देतो ते आपल्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला. कारण असं की त्यांच्या कृपेने माझी रविवारची सकाळ लवकर उजाडली आणि सकाळचं कोवळं ऊन अनुभवायला मिळालं. पण नंतर दिवसभर लाईटचा जो लपंडाव चालू होता त्यामुळे घामांच्या धारांनी मी कोवळा पडलो होतो.
त्याचं झाला असं की सकाळी लाईट गेले आणि डोक्यावरचा पंखा बंद झाला. "पंखा कोणी बंद केला"? असं एकदा ओरडलो. ...