देवनागरी
Roman
Press F12 to toggle

दलित

धम्म चळवळीची निष्पत्ती शुक्रवार, १० सप्टेंबर २०१०, २०:११ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

सुहास पळशीकर, सौजन्य – मटा

(लेखक पुणे विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

धर्मांतर हा तसा हिंदू समाजाच्या दृष्टीने नाजूक मुद्दा असतो. ‘बाहेरून’ आलेल्यांनी धर्मांतरं घडवून आणली, असं दु:ख कुरवाळीत बसणाऱ्या संघटनांची काही कमी नाही. पण धर्मांतरं का होतात, याबद्दल हिंदू समाजाने कधी फारशा गंभीरपणाने विचार केलेला नाही. ज्या हिंदुत्ववादी संघटनांना ...

महार-मांग भेदनीतितील वास्तव बुधवार, ०२ जून २०१०, १७:१७ (+०५:३०)

सिद्धाराम भै. पाटील majhe lekh

राजकुमारजोंधळे
एप्रिल उजाडला की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती महोत्सवाची महिनाभर रेलचेल असते. या निमित्ताने संभाजीनगरचेे (औरंगाबाद) मुक्त पत्रकार बी. व्ही. जोंधळे यांचा 14 एप्रिलच्या लोकसत्तात "बौध्द-मातंग भेदनीति कशासाठी?' या मथळ्याखाली लेख प्रकाशित झाला. सदर लेखात जोंधळे यांनी मांडलेल्या अवास्तव बाजू आणि प्रकाशात न आणू इच्छिणाऱ्या विविध पैलूंवर ...

जळणारे पारधी अन् कुलूपबंद संवेदना मंगळवार, १६ मार्च २०१०, ०१:१० (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

अरुण करमरकर, सौजन्य-लोकसत्ता

माढा तालुक्यातील जळीतकांडात एक-दोन नव्हे आठजण जळून खाक झाले. ही आग अपघाताने लागलेली नाही, तर मुद्दामहून कोणीतरी लावलेली. आग लावणाऱ्याने ती चारी बाजूंनी धडाडून पेटेल याचा जणू कडेकोट बंदोबस्त केलेला..

सकाळीच दूरध्वनी खणखणला आणि त्यावरून माढा तालुक्यातल्या आणखी एका पारधी जळीताची दुर्वार्ता कानावर दणकली. आगीने होरपळून कोणीही ...

प्लासी ते अणुयुग गुरुवार, ०४ मार्च २०१०, ०१:२८ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

गोविंद तळवलकर , सौजन्य – मटा

(लेख ३ जाने २००८ रोजी प्रकाशित झाला होता.)

इतिहासातील सनावळ्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घटनांची नोंद घेतलेली असते. त्या घटनांनी अर्थातच त्या त्या काळात दूरगामी परिणाम घडवलेले असतात. मग ती ब्रिटिश साम्राज्याचा भारतात पायाघालणारी प्लासीची लढाई असो की १८५७चे भारतीय स्वातंत्रयुद्ध असो , आज तेथपासून अणुयुगापर्यंत झालेल्या प्रवासात त्या घटनांचे ...

जोतीरावांची सत्यशोधक चळवळ मंगळवार, ०२ मार्च २०१०, ००:१८ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

य.दि.फडके, सौजन्य – मटा

सामाजिक समता म्हणजे ब्राह्मणापासून अस्पृश्य समजल्या जाणा-या सर्व पुरुषांची समता असा संकुचित अर्थ जोतीरावांना अभिप्रेत नव्हता. घराबाहेर समतेचा आग्रह धरणारे पुरुष घरात समता येऊ देण्यास तयार नसतात. असे पुरुष आपल्या अनुयायांमधे दिसताच जोतीरावांनी त्यांना धारेवर धरले…. विसाव्या शतकातील महाराष्ट्राचे इतिहासकार य. दि. फडके यांनी सत्यशोधक चळवळ ...

श्रीधरपंतांनी आत्महत्या का केली? शनिवार, २७ फेब्रुवारी २०१०, २०:०५ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

प्रबोधनकार ठाकरे, मटा वरुन साभार

श्रीधरपंत उर्फ बापू टिळकांचे प्रबोधनकार जवळचे स्नेही. त्यांच्या ’ माझी जीवनगाथा’ या रसाळ आत्मचरित्रात श्रीधरपंत डोकावून जातात. श्रीधरपंतांची सामाजिकबांधिलकी , तळमळ ,टिळकवाद्यांशी असलेल्या वादाचे तात्विक स्वरूप स्पष्ट करणारे हे प्रकरण या आत्मचरित्रातून साभार.

——————————————————————————————————–

मी पुण्यात पाऊल ...

श्रीधर बळवंत टिळक हेच खरे ’लोकमान्य’! शनिवार, २७ फेब्रुवारी २०१०, १९:५९ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,  म टा वरुन साभार

श्रीधरपंतांच्या आत्महत्येनंतर ’दुनिया ’ या मामा वरेरकर यांच्या साप्ताहिकाने खास ’ टिळक अंक ’प्रसिद्ध केला होता. त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक अप्रतीम लेख लिहिला होता. दोन असामान्य व्यक्तिमत्त्वांतील अकृत्रिक स्नेहाचा धागा येथे दिसतो.

—————————————————————————————————————-

मी , ता. २६ मेला जळगाव येथे बहिष्कृत ...

महाराष्ट्रात हे काय चाललंय ? शनिवार, २० फेब्रुवारी २०१०, २१:२२ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

उत्तम कांबळे, सौजन्य – सकाळ

डाळ महागलेली, तांदूळ महागलेला, एकूणच जगणं महागलेलं, सोबतीला पाणी आणि विजेची टंचाई आहेच. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात, त्यांचीही पूर्तता होऊ नये, अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. अशा वेळी सामान्य माणसानं ज्यांच्याकडे उत्तरासाठी पाहायचं, ती राजकीय मंडळी मात्र भावनेच्या राजकारणात मश्‍गूल आहेत. कधी भाषेची, कधी ...

मत आणि मतांतर शनिवार, ०७ नोव्हेंबर २००९, ००:०२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

खर तर आज यावर बोलणार नव्हतो, पण एका नोंदी वरील प्रतिक्रिया वाचून बोलावेसे वाटले. माझ स्पष्ट मत आहे की प्रत्येकच मत प्रत्येकाच्या दृष्टीने बरोबर असते. आता यावरून देखील मतांतर असू शकेल. अनेकांना महात्मा गांधीजी ह्यांच्या मुळे देश स्वतंत्र झाला असा दृढ विश्वास आहे. अनेकांना गांधीजी हा चेष्टेचा विषय आहे. प्रत्येकच मत तो ज्या परिस्थितीत जन्माला आला आणि वाढला. ज्या ...

शब्दांच्या कोलांट्या उड्या शुक्रवार, १६ ऑक्टोबर २००९, ०१:५० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

संध्याकाळी कंपनीतून सुटल्यावर घरी येत असताना चिंचवडमधील चाफेकर चौकात एक भले मोठे पोस्टर लावले होते. त्यावर प्रत्येक तासाला ‘फ्री गिफ्ट’ जिंका अस लिहिलेलं होते. पोस्टर छान होत पण ‘फ्री गिफ्ट’ म्हणजे काय?. गिफ्ट नेहमी ‘फ्री’ च असत ना, जर गिफ्ट विकत असेल तर त्याला कोणी गिफ्ट कसे म्हणेल? पोस्टर मधील ‘फ्री गिफ्ट’ शब्द वाचून हसू आले. आज दुपारी जेवण करत असताना माझ्या ...