देवनागरी
Roman
Press F12 to toggle

चीन

यिवु मधील गुंडागर्दी; For Indian Trader... रविवार, १५ जानेवारी २०१२, १०:१० (+०५:३०)

अक्षरधूळ

दीपक रहेजा आणि श्यामसुंदर अगरवाल हे दोन भारतीय तरूण, येमेनी मालक असलेल्या एका व्यवसायात कामाला होते. चीनमधील झेजियांग प्रांतातल्या यिवु शहरात असलेल्या ऑफिसमधे हे दोघे काम करत असत. चिनी माल खरेदी करून तो निर्यात करायचा असे साधारण यांच्या व्यापाराचे स्वरूप होते. हे दोघे काम करत असलेल्या फर्मची, स्थानिक लोकल व्यापार्‍यांना असलेली देणी बरीच वाढली होती व त्या बाबतीत ...

चीनचे ब्रम्हपुत्रेवरचे धरण मंगळवार, २९ नोव्हेंबर २०११, ०७:३५ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

तिबेटमधल्या नद्यांच्यावर चिनी सरकार बांधत असलेली धरणे हा एक अतिशय ज्वलंत असा वादाचा मुद्दा बनला आहे. गेले वर्षभर या बाबत अनेक लेख व बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेले Downstream देश या बाबतीत साहजिकच अतिशय साशंक व जागरूक आहेत. पाणी हा किती महत्वाचा व ज्वलंत प्रश्न होत चालला आहे याचा यावरून अंदाज बांधता येतो. सिंधू नदीचे बहुतांशी पाणी ज्या नदीतून ...

विश्वासघात- 2 मंगळवार, २२ नोव्हेंबर २०११, ०७:१३ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

1913 या साली, ब्रिटिश भारत, तिबेट व चीन या तीन देशांच्या प्रतिनिधींची शिमला येथे एक बैठक झाली. या बैठकीच्या अखेरीस एका कराराच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. हा करार शिमला करार म्हणून ओळखला जातो. या करारान्वये, भारत, तिबेट व चीन या तिन्ही देशांच्या मधल्या परस्पर संबंधाचे स्वरूप व सीमा निश्चित करण्यात आली. या कराराच्या कागदपत्रांवर, चिनी प्रतिनिधी ...

चीन युद्धातील चुका आणि घोडचुका सोमवार, २१ नोव्हेंबर २०११, ११:३१ (+०५:३०)

लेख संग्रह ...

मेजर जनरल(निवृत्त) शशिकांत पित्रे, सौजन्य – सकाळ सप्तरंग

 

भारत आणि चीन यांच्यातील कुरापती सुरू होत्या, त्या चीनच्या बाजूकडूनच. सातत्याने सीमेवर कुरबुरी करून भारताला डिवचण्याचे चीनचे उद्देश सुरूच होते. चीनने आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी आपल्याला हवे तेव्हा युद्ध पुकारले आणि हवे तेव्हा थांबवले. 1962 च्या कटू आठवणींचा व तो सारा इतिहास या वेळी. मागील अंकात भारत-चीन ...

विश्वासघात- 1 शुक्रवार, १८ नोव्हेंबर २०११, ०९:४२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

एक भारतीय नागरिक म्हणून तुमच्या आयुष्यात आलेला सर्वात अपमानास्पद व लाजिरवाणा प्रसंग कोणता? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर निर्विवादपणे मी 1962 च्या युद्धात चीनने भारताचा केलेला सपशेल व दारूण पराभव हेच उत्तर देईन. माझी खात्री आहे की माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा मोठे असे सर्व ज्येष्ठ नागरिक सुद्धा हेच उत्तर देतील. एखाद्या फुग्याला टाचणी लावावी तसे काहीसे चीनने आम्हा ...

सीमावाद भारत-चीनचा रविवार, १३ नोव्हेंबर २०११, १३:३१ (+०५:३०)

लेख संग्रह ...

शशिकांत पित्रे, सौजन्य – सकाळ सप्तरंग

आपल्या शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न भारताकडून नेहमीच केला जातो; पण विस्तारवादी वृत्तीच्या चीनकडून त्यामध्ये अडथळे आणले जातात. चीनचा हा पवित्रा आजचा नाही. अरुणाचल प्रदेशाबाबत चीन अनेक वर्षापासून कुरापती काढत आहे. माओ- त्से- तुंग यांच्या काळापासून भारताशी वैरभाव बाळगणाऱ्या चीनबरोबर 1962 ला झालेल्या युद्धात ...

संथ वाहते इरावती माई! सोमवार, १० ऑक्टोबर २०११, १५:०९ (+०५:३०)

अक्षरधूळ

काही काही गाणी अशी काही जमून येतात की कितीही वर्षे लोटली तरी त्या गाण्यांची आठवण मनात अगदी ताजी राहते. ‘ संथ वाहते कृष्णा माई ‘ हे असेच एक गाणे आहे. राजा परांजपे यांच्या चित्रपटासाठी, गदिमांनी लिहिलेले व सुधीर फडके यांनी गायलेले! संगीत होते दत्ता डावजेकर यांचे!. या गाण्याची दुसरी ओळ तर मला नेहमीच खूप भावते. ती ओळ अशी आहे ” तीरावरच्या सुख दु:खांची जाणीव तिजला नाही ” नदी वाहतेच आहे, ...

नव्या आक्रमणाचा धोका सोमवार, १९ सप्टेंबर २०११, १४:४३ (+०५:३०)

अक्षरधूळ

भारतीय उपखंडावर गेल्या पाच हजार वर्षात जेवढी आक्रमणे झाली त्यातले ब्रिटिशांचे आक्रमण व1962 मधले चिनी आक्रमण ही सोडली तर बाकी सर्व आक्रमणे ही वायव्येकडून झालेली आहेत. अगदी गेल्या साठ वर्षाचा इतिहास जरी बघितला तरी सुद्धा 1947, 1965, 1971 आणि 1999 यातील युद्धे सुद्धा या वायव्येकडच्या आक्रमणांमुळेच झालेली आहेत. आता 2011 मध्ये एका नवीनच आक्रमणाचा धोका भारताला निर्माण झाला आहे असे दिसते. हे ...

दादागिरी रविवार, ११ सप्टेंबर २०११, ०९:४० (+०५:३०)

अक्षरधूळ

भारतीय नौदलाच्या, आयएनएस ऐरावत या युद्धनौकेने, या वर्षीच्या जुलै महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात, दक्षिण मध्य व्हिएटनाम मधल्या न्हा ट्रॉन्ग या बंदराला भेट दिली होती. या भेटीनंतर ही युद्धनौका उत्तर व्हिएटनाम मधील है फॉन्ग या बंदराकडे निघाली होती. 22 जुलै 2011 या दिवशी ही नौका न्हा ट्रॉन्ग बंदराजवळच्या व्हिएटनामच्या किनार्‍यापासून सुमारे 45 नॉटिकल मैल अंतरावर दक्षिण चिनी ...

सुखी आयुष्याचा मूलमंत्र मंगळवार, २३ ऑगस्ट २०११, ०८:४८ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

1980च्या सुमारास चिनी सरकारने, त्यांच्या मताने असलेला, सुखाचा एक मूलमंत्र लोकांना दिला. हा मूलमंत्र होता ‘ एक कुटुंब एक मूल ‘ . ताबडतोब हे सरकारी अधिकृत धोरण म्हणून ठरवण्यात आले व त्याची अंमलबजावणी प्रचार व दडपशाही या दोन्ही मार्गांनी सुरू झाली. चिनी शहरांच्यातील नागरिकांना प्रत्येक गोष्टीसाठी परवाना घ्यावा लागतो. त्यामुळे या हुकुमाची अंमलबजावणी करणे सुलभ गेले. ...