पंधरा वीस वर्षांपूर्वी म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे नव्हता त्या वेळेला, पुणे-मुंबई प्रवास हा मोठा बेभरवशाचा मामला असे. प्रवासाला किती वेळ लागेल? हे सांगणे कोणालाच शक्य नसे. याचे प्रमुख कारण म्हणजे खोपोली जवळच्या बोर घाटात दररोज होणारा वाहतुक मुरंबा. कधीही बघितले तरी शे पाचशे ट्रकची धुडे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी किंवा मुंगीच्या पावलांनी पुढे सरकताना दिसत. ...