देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Tibet

पळा पळा कोण पुढे पळे तो! -2 गुरुवार, १५ डिसेंबर २०११, ०८:०२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

भारताच्या ईशान्येला असलेली तिबेट बरोबरची सीमा ही एक नैसर्गिक भौगोलिक सीमा असल्याने ती ओलांडणे हे फक्त या सीमेवर असलेल्या पर्वत शिखरांच्या रांगांच्या मधे मधे असलेल्या काही खिंडीतून किंवा ही सीमा ओलांडून वाहणार्‍या तीन किंवा चार नद्यांच्या खोर्‍यांमधून व नदी पात्राला लागून असलेल्या पायवाटांनीच फक्त शक्य आहे. या अशा नैसर्गिक संरक्षणामुळे व 1959 साला पर्यंत या सीमेबद्दल ...

पळा पळा कोण पुढे पळे तो!-1 (Run for you... बुधवार, १४ डिसेंबर २०११, ०७:१२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

1962 मधे झालेल्या चींन बरोबरच्या लढाईत, भारताचा जो दारूण आणि सपशेल पराभव झाला त्याची पार्श्वभूमी व पूर्व लडाखमधला घटनाक्रम, आपण मागेबघितला आहे. परंतु हे युद्ध प्रत्यक्षात दोन आघाड्यांच्यावर लढले गेले होते. लडाखबरोबरच भारताच्या ईशान्य कोपर्‍यातल्या अरुणाचल प्रदेश या राज्याच्या सीमेवर या युद्धाची दुसरी व अतिशय महत्वाची आघाडी होती. लडाखमधल्या सीमेबाबत भारत व चीन ...

चीनचे ब्रम्हपुत्रेवरचे धरण मंगळवार, २९ नोव्हेंबर २०११, ०७:३५ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

तिबेटमधल्या नद्यांच्यावर चिनी सरकार बांधत असलेली धरणे हा एक अतिशय ज्वलंत असा वादाचा मुद्दा बनला आहे. गेले वर्षभर या बाबत अनेक लेख व बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेले Downstream देश या बाबतीत साहजिकच अतिशय साशंक व जागरूक आहेत. पाणी हा किती महत्वाचा व ज्वलंत प्रश्न होत चालला आहे याचा यावरून अंदाज बांधता येतो. सिंधू नदीचे बहुतांशी पाणी ज्या नदीतून ...

विश्वासघात- 3 बुधवार, २३ नोव्हेंबर २०११, ०७:२५ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

1959 च्या ऑक्टोबर महिन्यात भारताच्या पूर्व लडाख सीमेवरच्या चिनी सैन्याची परिस्थिती इतकी मजबूत झाली होती की त्यांच्यासमोर भारतीय सीमारक्षक पोलिसांचा निभाव लागणे अशक्यच होते. कोन्गका खिंडीमधल्या दुर्घटनेनंतर, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सीमा रक्षणाची जबाबदारी भारतीय सैनिक दलांकडे सोपवण्याचा निर्णय घ्यावाच लागला. या ...

विश्वासघात- 2 मंगळवार, २२ नोव्हेंबर २०११, ०७:१३ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

1913 या साली, ब्रिटिश भारत, तिबेट व चीन या तीन देशांच्या प्रतिनिधींची शिमला येथे एक बैठक झाली. या बैठकीच्या अखेरीस एका कराराच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. हा करार शिमला करार म्हणून ओळखला जातो. या करारान्वये, भारत, तिबेट व चीन या तिन्ही देशांच्या मधल्या परस्पर संबंधाचे स्वरूप व सीमा निश्चित करण्यात आली. या कराराच्या कागदपत्रांवर, चिनी प्रतिनिधी ...

विश्वासघात- 1 शुक्रवार, १८ नोव्हेंबर २०११, ०९:४२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

एक भारतीय नागरिक म्हणून तुमच्या आयुष्यात आलेला सर्वात अपमानास्पद व लाजिरवाणा प्रसंग कोणता? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर निर्विवादपणे मी 1962 च्या युद्धात चीनने भारताचा केलेला सपशेल व दारूण पराभव हेच उत्तर देईन. माझी खात्री आहे की माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा मोठे असे सर्व ज्येष्ठ नागरिक सुद्धा हेच उत्तर देतील. एखाद्या फुग्याला टाचणी लावावी तसे काहीसे चीनने आम्हा ...

द ग्रेट बेन्ड शनिवार, १७ सप्टेंबर २०११, ०८:२३ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

तिबेटमधल्या कैलाश पर्वताजवळच्या व 18000 फूट उंचीवर असलेल्या एका गोठलेल्या सरोवरातून, तीन अतिशय महत्वाच्या नद्या उगम पावतात. त्यातली एक म्हणजे सिंधु नदी. ही नदी वायव्येकडे वहात जाते. दुसरी सतलज नदी दक्षिणेकडे वहात जाते.कैलाश जवळच उगम पावून पण पूर्व दिशेला वहात जाणारी तिसरी महत्वाची नदी म्हणजे यारलुंग त्सांगपो किंवा ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी 1800 मैल लांब ...

सिंधू नदी काठची नगरी रविवार, ११ सप्टेंबर २०११, ०९:२५ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

माझ्याजवळ रिकामा वेळ असला की मी पुष्कळ वेळा माझ्या संगणकावर गूगल अर्थ हा प्रोग्रॅम चालू करतो. आपण गत आयुष्यात अनेक ठिकाणी प्रवास केलेला असतो. ती गावे किंवा ठिकाणे गुगल अर्थ वर शोधून काढण्यात खूप मजा येते. वेळ कसा उडून जातो ते कळतही नाही.या शिवाय ज्या भू भागांसंबंधी आपल्याला काहीच माहिती नसते अशा ठिकाणी कोणती गावे आहेत, तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे हे बघायला सुद्धा मला खूप ...

चहाच्या कारवानांची घाटनाळ रविवार, १३ मार्च २०११, ०९:३५ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

भारत आज जगातील दुसर्‍या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात चहाचे उत्पादनच नव्हते. सर्व चहा चीनमधून आयात केला जात असे. इ.स. 1835 मध्ये डॉ.आर्थर कॅम्पबेल या ब्रिटिश अधिकार्‍याने सिक्किमच्या चोग्यालांच्या मदतीने आपल्या बंगल्याच्या आवारात प्रथम चिनी चहाच्या बिया पेरल्या. त्यांची उतम वाढ झाली आणि त्या शतकाच्या ...

पळा पळा कोण पुढे पळे तो! -1 शनिवार, ०२ ऑक्टोबर २०१०, १४:५३ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

1962 मधे झालेल्या चींन बरोबरच्या लढाईत, भारताचा जो दारूण आणि सपशेल पराभव झाला त्याची पार्श्वभूमी व पूर्व लडाखमधला घटनाक्रम, आपण मागे बघितला आहे. परंतु हे युद्ध प्रत्यक्षात दोन आघाड्यांच्यावर लढले गेले होते. लडाखबरोबरच भारताच्या ईशान्य कोपर्‍यातल्या अरुणाचल प्रदेश या राज्याच्या सीमेवर या युद्धाची दुसरी व अतिशय महत्वाची आघाडी होती. लडाखमधल्या सीमेबाबत भारत व चीन यांच्यात ...