देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अनुभव-प्रकटन-विचार

मनाचे तारू......... मंगळवार, ०२ फेब्रुवारी २०१०, ०९:१९ (+०५:३०)

भानस Sardesaies

एखादी वस्तू, पदार्थ, स्वर-आवाज, रंग, रूप थोडक्यात सांगायचे तर ( जे मला कधीच जमत नाही. थोडक्यात सांगणे हो.... ) चिवचीव आवाज ऐकला चिमणी. बटाटेवड्याचा विचार मनात यायचा अवकाश......., काय होते हे सांगायला हवे का? सिनेमाला जायचे म्हटले की ' ए वनचे समोसे ' पाऊस म्हटला की उगीच शोभेची का होईना पण छत्री अन मनात हुळहुळणाऱ्या-तरल तर कधी फजिती झालेल्या आठवणी - चिंब भिजून खाल्लेला भुट्टा - जागोजागी ...

दाद द्यायलाच हवी असे........ मंगळवार, २२ डिसेंबर २००९, ०२:५१ (+०५:३०)

भानस Sardesaies

हल्लीच माझ्या मैत्रिणीच्या मुलाची बॅग गडबडीत रिक्शातून घ्यायचीच राहून गेली. मुलगा बिचारा अगदी घाबरला, गोंधळला....कपडे-सामान सुमान गेले वर आई-बाबा ओरडतील ही भिती. रिक्षा तर गेली निघून. बरे याच्याकडे सामान जास्त असल्याने मित्र आलेला सोबत दुसऱ्या रिक्शातून आणि त्याने हा घोळ केलेला. आता मित्राला किती दोष देणार आणि देऊनही उपयोग काय..... बॅग थोडीच मिळणार होती. शेवटी मन खट्टू करून हा ...

ही कीड कधीतरी मरेल का? गुरुवार, १० डिसेंबर २००९, ०१:४५ (+०५:३०)

भानस Sardesaies

एखादे दिवशी अगदी उठण्यापासूनच सगळ्या गोष्टी चुकतच जातात. कारण तसे काही खास घडत असते असे मुळीच नाही. न चुकता गजर वाजतो. डोळे तटकन उघडतात. आजूबाजूला निरव शांतता असते. अजून पाचच मिनिटे झोपेची अनिवार गुंगी अनुभवावी असा मोह होतो. सहा-सात तास गाढ झोप झाली तरी या पाच मिनिटांची सर कशालाच नाही. आजही असाच मोह झाला अन आवरलाच नाही. पाच मिनिटांची ही उबदार धुंदी तब्बल अर्धा तास अंगात भिनून ...

सारे चित्त जगी लागो, मुखी जपे राम..... मंगळवार, ०१ डिसेंबर २००९, ०९:४५ (+०५:३०)

भानस Sardesaies

" अग मेल्यांनो काय खीखी लावलीये गं कधीपासून? बरं खिदळताय तर संपूर्ण बत्तिशी दाखवा. तिथे कशाला चोरी मारी करताय? रोजचं मेलं कोणीतरी माझ्या जपाच्या वेळी तडमडत असतं. एकही दिवस मनासारखा जप काही होत नाही. " आजी करवादत होती. आम्ही सगळे तोंड दाबून लांब पळून गेलो. मग दुपारी आजोबा जेवायला आले तशी मी हळूच विचारले, " आजोबा, मला एक प्रश्न पडलाय. आम्ही सगळ्यांनी खूप चर्चा केली पण.... . तसे प्रश्न अजून ...

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा........ गुरुवार, १९ नोव्हेंबर २००९, ०१:४८ (+०५:३०)

भानस Sardesaies

डॉ. हिरेमठांनी ऑपरेशन झाल्या झाल्या बाहेर येऊन आईला व मला सगळे व्यवस्थित झाल्याचे सांगितले. अर्ध्या पाऊण तासात तुझ्या बाबांना अती दक्षता विभागात हालवतो. आता अजिबात काळजी करायची नाही. तुम्ही दोघी पहाटेपासून एक मिनिटही इथून दूर गेला नसाल, जा जरा चहा तरी घेऊन या. मी तुमच्या दोघींपैकी कोणालाही इथे भरती करून घेणार नाही, तेव्हां पळा. असा प्रेमळ दम देऊन डॉक्टर पुन्हा बाबांकडे गेले. ...

कुमरी..... रविवार, १५ नोव्हेंबर २००९, ०१:५१ (+०५:३०)

भानस Sardesaies

मी वर्षाची असतानाच वडील गेले. आई नेहमी म्हणायची हिला ओवाळून द्या फेकून म्हणजे होतील ते बरे. तिचे बिचारीचे बरोबरच होते. मी झाले आणि एकाएकी वडील आजारी पडले. पदरात आठ मुले व एक पोटात. मी जेमतेम वर्षाची होत होते. माझ्याच येण्याने वडिलांना असाध्य रोगाने ग्रासलेय हा आईचा त्यावेळचा त्रागा. अडतीस साली कॅन्सरवर मात करणारे-थोडेतरी जीवन वाढेल असेही औषध उपचार वडिलांना मिळाले नाहीत. अन ते ...

खरेच का मी प्रेमात पडलोय....... शनिवार, ०७ नोव्हेंबर २००९, ०५:२८ (+०५:३०)

भानस Sardesaies

प्रेमविवाह करून घरात आलेल्या सुनांचा उल्लेख कालच्या पोस्टमध्ये आला आणि अनेक घटना डोळ्यासमोर आल्या. कुठल्याही संबंधांच्या अबाधित राहण्याच्या मुळाशी जर ' प्रेम ' असेल तर कितीही प्रतिकूल परिस्थितीतही ते रुजते, वाढते, टिकते.... खंबीरपणे स्वतःचे विश्व तयार करते. प्रेम विवाह हा आज आपल्या समाजात बराचसा रुळतो आहे. काळानुरूप विरोधाची धार सर्वसाधारणपणे किंचितशी कमी झालीये. किमान ...

निचरा....... गुरुवार, २९ ऑक्टोबर २००९, ०२:५७ (+०५:३०)

भानस Sardesaies

" अहो, जरा एक मिनिट ...."
मी वळून पाहिले तर साधारण साठीच्या जवळ पोचलेल्या बाई आमच्या रुममध्ये डोकावत मला बोलवत होत्या. रुबीमध्ये बाबांची काल दुपारीच अँजोप्लॅस्टी झाली होती. तेव्हापासून बाबा अर्धवट गुंगीतच होते. पायावर वजन ठेवलेले. चोवीस तास पाय हालता नये. रात्री आईला जबरदस्तीने काकूच्या घरी पाठवून मी बाबांचा पाय धरून बसून होते. इथला आयसीयू वॉर्ड बराच मोठा आहे. पार्टिशन्स घालून ...

ताई आतां फुडलं विलेक्शन कधी व्हईल ह... सोमवार, २६ ऑक्टोबर २००९, २२:२६ (+०५:३०)

भानस Sardesaies

" ताई अवो आता फुडलं विलेक्शन कधी व्हईल हो? " माझी मोलकरीण मला विचारत होती. आधीच माझं डोकं सटकलेलं. त्यात मी एकदा दुर्लक्ष केलं, कोणी मला हाक मारीत नव्हतं तरी उगाचचं आले आले म्हणत तिच्यासमोरून पळ काढला. मला भीती वेगळीच, वड्याचा राग वांग्यावर निघायचा आणि ती अर्धे घासलेले भांडे दाणकन सिंकमध्ये आपटून " कशापायी आरडताय? मला न्हाई झेपायचं, मी चाल्ली . " म्हणत सरळ निघून जायची. आणि मग दुसरी बया ...

जळी स्थळी काष्ठी पाषाणी- अव्याहत धा... बुधवार, ०७ ऑक्टोबर २००९, ०३:२९ (+०५:३०)

भानस Sardesaies


आमच्या बाबांना मी नेहमी या गोष्टीवरून रागावत असते. पण खरे सांगू का त्यांची त्यामागची भूमिका मला पटलेली आहे. त्यांच्या वयाकडे पाहता मात्र त्यांनी असे करू नये या मतावर मी ठाम आहे. अमुक दिवशी प्रवास करायचा हे जर ठरलेले असेल तर कुठले वाहन व त्याचे रिझर्वेशन केले की डोक्याचा एक ताप कमी. परंतु बाबांना काही केल्या हे पटत नाही. त्यांचे आपले ठरलेले उत्तर, " अग, इथे दहा ...