काल मुंबईला पहिला पाउस पडला. तसा नाही म्हणायला थोडे फार शिंतोडे उडवुन जातोय दोन दिवसांपासुन, पण “पाउस पडला” असं जे म्हणतो तसा आजच पडला. पाउस पण काय लिहायचा विषय आहे कां? छे.. आधिच इतक्या कविता, लेख लिहिल्या गेले आहेत ( अगदी पुर्वी पासुन) की आता त्यावर नविन काही लिहायला उरलंच नाही.
गरिबाची झोपडी, किंवा, घरात पाणि शिरणं..हे सगळं नेहेमीप्रमाणेच सुरु आहे. आज सकाळी मालाड ...