आज मला मागे आधी बोललो होतो ना, एका कंपनीत मी मुलाखत दिली होती. त्यांची ऑफर आली. मी जेवढी अपेक्षा केली होती त्याच्या दुप्पट मला त्यांनी ऑफर केली आहे. थोडा इथ जॉइनिंग डेटचा गोंधळ चालू आहे. पण उद्यापर्यंत सुटून जाईल तो प्रश्न. आज सकाळी वातावरण खूपच छान होते. म्हणजे काल रात्री पासूनच पुण्यात भुरभूर चालू होती. आत्ताही पाऊस चालू आहे. आज माझे वडील बरोबर होते म्हणून. नाही तर ...
खर तर आज यावर बोलणार नव्हतो, पण एका नोंदी वरील प्रतिक्रिया वाचून बोलावेसे वाटले. माझ स्पष्ट मत आहे की प्रत्येकच मत प्रत्येकाच्या दृष्टीने बरोबर असते. आता यावरून देखील मतांतर असू शकेल. अनेकांना महात्मा गांधीजी ह्यांच्या मुळे देश स्वतंत्र झाला असा दृढ विश्वास आहे. अनेकांना गांधीजी हा चेष्टेचा विषय आहे. प्रत्येकच मत तो ज्या परिस्थितीत जन्माला आला आणि वाढला. ज्या ...
परवा म्हणजे बुधवारी कंपनीत जेवणाच्या वेळी माझ्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना मी राज ठाकरे दसऱ्याला नगरला आला होता. त्याची सभा मस्त झाली अस म्हटलं. आमच्यातील एकाला काय झाले कुणास ठाऊक. मला त्याने विचारले की तुला राज ठाकरे आवडतो ना. मी त्याला म्हणालो माझा त्याच्या कृतीला पाठींबा आहे. तो जे बोलतो तो ते करतो म्हणून मला तो आवडतो. बाकी उद्या मराठीचा मुद्धा घेऊन सोनिया ...
आत्ताच ‘वट्पोर्णिमा’ झाली, बायकोचा फोन आला होता की ‘तुला अजुन सात जन्मासाठी बूक केले आहे..’ ..’अरे व्वा!! छान केलस’ यापेक्षा साधे व सरळ उत्तर माझ्याकडे नव्हते.
पण माझ्या मनात चलबिचल होत होती. मला तिला सांगावस वाटत होत की ‘बाई! आजकाल उद्याचा कोणी भरवसा देऊ शकत नाही आणि तु सात जन्माच्या गोष्टी काय करते आहेस.’
बर एक वेळेस आपण हे खर जरी मानल तर दर वर्षी का हे व्रत ...
नुकताच संदिप साखरे यांच्या ब्लॉगवर ’निवडणुक न भावलेली..’ हा लेख वाचला. गेल्या काही खेपांपासुन आपल्याला त्रिशंकुच लोकसभा मिळत आहेत. यंदा सुद्धा तसलीच परिस्थिती असेल असं वाटतंय. कोणताच पक्ष बहुमत मिळवु शकत नाही आणि मग डावे, उजवे, अलिकडचे, पलिकडचे त्यांना वाटेल तसं नाचवतात या पक्षांना. याच संदर्भात संदिप साखरेंनी मांडलेलं मत वाचलं..
या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट ...
काय म्हणावं या बि.सी.सी.आय.ला?
आत्ताच टि.व्ही.वर बातमी पाहिली, इंटरनेटवर - टाईम्स ऑफ इंडीयाच्या साईटवर सुद्धा वाचली, "बि.सी.सी.आय. चा निर्णय.. आय.पी.एल. भारताबाहेर होणार...!"
बातमी पाहिली आणि माझ्या मनात हाच प्रश्न आला. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळं आय.पी.एल. पुढं ढकलली गेली होती, सुरक्षेच्या कारणास्तव. ते योग्यच होते.
त्यानंतर बि.सी.सी.आय.नं चंगच बांधलेला आहे, आय.पी.एल. ...