लग्ना आधी आईकडे दोन भाजीवाल्या घरीच यायच्या. दोघींचे वेगवेगळे वार ठरलेले असायचे. भाजी ताजी असायची पण महाग असायची. त्या दोघीजणी भाजीच्या जड जड टोपल्या घेऊन यायच्या म्हणून आई त्यांच्याकडून भाजी घेत असे. आईकडे राहत असताना १५-२० दिवसांनी आमची चक्कर पुण्याच्या मंडईत होत असे. शनिपाराचा चौक आहे तिथून मंडईकडे जाणारा रस्ता आहे तिथे सुरवातीला बऱ्याच भाजीवाल्या बायका बसायच्या. ओळीने ...