भारताच्या ईशान्य कोपर्यातल्या ‘सात बहिणी‘ म्हणून ओळखल्या जाणार्या राज्यांपैकी एक राज्य म्हणजे मेघालय. अतिशय सुंदर वनश्रीने नटलेले हे राज्य, नेहमीच हिरवे गार असते. या मेघालयात, पश्चिम खासी टेकड्यांच्या भागात चेरापुंजी हे प्रसिद्ध गाव आहे. चेरापुंजी या गावाचे नाव एखादा शाळेत जाणारा मुलगा सुद्धा सांगू शकेल इतके ते प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गाव ...