बाजीराव पेशव्यांचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. “मुळावर घाव घाला, फांद्या आपोआप गळून पडतील” म्हणून! दिनांक 2 फेब्रुवारी 2012 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 2जी घोटाळ्याबद्दलच्या रिट पेटिशनवर दिलेल्या निकालाची बातमी वाचल्यावर मला पहिली कसली आठवण झाली असेल तर बाजीराव पेशव्यांच्या याच वाक्याची! सुप्रीम कोर्टाने 2जी घोटाळ्यात, अवैध मार्गांचा वापर करून ज्या कंपन्यांनी परवाने ...