देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गांधी

गांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन रविवार, २५ डिसेंबर २०११, १९:४२ (+०५:३०)

लेख संग्रह ...

रामचंद्र गुहा, सौजन्य – लोकसत्ता

 

सुमारे १५ वर्षांपूर्वी मुंबईच्या हुतात्मा चौकातील पदपथावर मला हमीद दलवाई यांचे ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक आढळले. अत्यंत अल्प किमतीत म्हणजे २०-२५ रुपयांना मिळालेल्या या पुस्तकाचे मूल्य मात्र अमूल्य आहे. गेल्या १५ वर्षांत मी या पुस्तकाची किमान सहा-सात पारायणे केली असतील. हमीद दलवाई आज फार थोडय़ा लोकांना माहिती असले ...

समाजसुधारक गांधीजी शुक्रवार, २३ सप्टेंबर २०११, १२:२९ (+०५:३०)

लेख संग्रह ...

रोहिणी गवाणकर, सौजन्य – लोकसत्ता

एकदा कस्तुरबांचे व गांधीजींचे संडास सफाईवरून मतभेद झाले. गांधीजींनी कस्तुरबांना घराबाहेर काढले. कस्तुरबा गेल्या तर नाहीतच. पण ‘तुम्ही मला चालती हो असं सांगूच शकत नाही’ असेही  कस्तुरबांनी ठणकावले. पुढे गांधीजी हे स्त्री-पुरुष समानतेचे कट्टर समर्थक बनले. समाजाला त्यांनी समानतेचे धडे दिले. गांधीजींच्या स्वत:च्या आयुष्यातील काही ...

जोसेफ ललीव्हेल्ड यांच्या ‘नजरेतले’गांधी... गुरुवार, ०७ एप्रिल २०११, १३:०१ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

मार्टिन ल्युथर किग, नेल्सन मंडेला यांच्यासारखे जगन्मान्य नेते महात्मा गांधींना आदर्श मानतात. कोठे शांततापूर्वक निदर्शने होऊन तेथील राज्यकर्ते हादरले, उखडले गेले तर ’ती निदर्शने गांधींची आठवण करून देतात’, असे जगभर म्हटले जाते. अमेरिका वा युरोपातल्या कोणाहीपेक्षा एका भारतीयास हा मान मिळतो; याची पोटदुखीच ललीव्हेल्ड यांना असण्याचा संभव असून, त्यातून त्यांचाच वंशवाद ...

महात्मा आणि क्रांतिज्वाला बुधवार, ०२ मार्च २०११, ०९:३७ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

संजय चिटणीस, सौजन्य – लोकसत्ता

सर जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली १९२८ साली एक कमिशन भारतात आले होते. या कमिशनवर भारतातील सर्व पक्षांनी बहिष्कार घातला होता. हे कमिशन जिथे जिथे जाई, तिथे हरताळ पाळण्यात येऊन निषेधाच्या प्रचंड मिरवणुका निघत व ‘सायमन गो बॅक‘ अशा घोषणा दिल्या जात. ३१ ऑक्टोबर १९२८ रोजी हे कमिशन लाहोर येथे गेले असता जनतेने लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली ...

माझा शिवबादादा बुधवार, ०५ जानेवारी २०११, १४:३९ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

अनिल अवचट, सौजन्य – अनुभव दिवाळी २०१०

छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राचं दैवत. चतुर, मुत्सद्दी, दूरदर्शी, पराक्रमी, आघाडीवर राहून लढणारा जाणता राजा! दुसर्‍या धर्माचा द्वेष न करता आपला धर्म पाळता येतो हे दाखवणारा लोकहितदक्ष राजा! आज त्यांचे अभिमानी पुष्कळ आहेत, पण लोक खर्‍या शिवाजी महाराजांना कधी ओळखतील? एक ललित चिंतन.

————————————————————————————

मध्यंतरी ...

महाराष्ट्राचा राजकीय वेदांत गुरुवार, ३० डिसेंबर २०१०, १५:१० (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

डॉ. सदानंद मोरे, सौजन्य – साप्ताहिक सकाळ

एखाद्या लोकसमूहामध्ये एकत्वाची जाणीव निर्माण झाली म्हणजे त्या लोकांच्या राष्ट्राचा उदय झाला, असे स्थूलमानाने म्हणता येईल. जोतिराव फुले यालाच एकमय लोक असे म्हणतात. अशा प्रकारच्या एकत्वाची जाणीव ज्या घटकांमुळे निर्माण होऊ शकते त्यांच्यामध्ये वंश, धर्म, भाषा यांचा समावेश होतो. व्यापक अर्थाने संस्कृतीलासुद्धा असा घटक मानायला ...

राष्ट्रपिता कोण ? बुधवार, ०१ डिसेंबर २०१०, २२:४१ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

मधू लिमये (सत्याग्रही विचारधारा, १९९३), सौजन्य – लोकसत्ता

संघ परिवाराने अनेक ऐतिहासिक पूर्वग्रह आणि इतिहासाचे चुकीचे अर्थ जोपासले आहेत. आपल्या पूर्वग्रहदूषित कल्पनांच्या आधारे चुकीचाच नव्हे तर राष्ट्राच्या मूळ संकल्पनेला बाधक अन्‌ घातक प्रचारही गेली सत्तर वर्षे त्यांनी चालविला आहे.

महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानण्यास भाजपच्या नेत्यांनी आपला विरोध ...

एकविसाव्या शतकातही समाजवाद शुक्रवार, २६ नोव्हेंबर २०१०, २३:२९ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

ग. प्र. प्रधान, सौजन्य – लोकसत्ता

प्रत्येक राजकीय विचारसरणी ही कालसापेक्ष असते आणि काळ पुढे गेल्यावर परिस्थिती बदलली की, त्या विचारसरणीतील तत्त्वांचा मूलभूत आशय कायम ठेवून तिच्यात आवश्यक ते बदल करावे लागतात. कृती करताना तत्कालीन समाजस्थितीचे भान ठेवावे लागते. विचारांमध्ये अशी गतिमानता ठेवली नाही तर राजकीय नेते आणि राजकीय पक्ष कर्मठ आणि ठोकळेबाज बनतात आणि त्यामुळे ...

ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भग... रविवार, ०३ ऑक्टोबर २०१०, १८:२८ (+०५:३०)

नितीन निमकर अनंतफंदी

काल २ ऑक्टोबर गाँधी जयंती....
एक ३० जानेवारी आणि २ ऑक्टोबर हे दिवस आता फक्त दिवस साजरे करण्यापुरते उरलेत, आपल्या देशात गाँधीजी सारखे महान व्यक्तिमत्व झाले हे आपल्या देशा सौभाग्य. पण आपल्या देशातच जेवढा बापुंचा, त्यांचा विचारांचा जेव्हढा अपमान होतो तेव्हढा जगात दुसरीकडे कुठे होत नसेल, हेच आपले दुर्भाग्य आहे.
आपले राजकारणी सुद्धा या दिवशी फक्त ...

स्वातंत्र्य : अर्थ आणि परमार्थ बुधवार, ०१ सप्टेंबर २०१०, १६:३९ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

गांधीजींचे अध्यात्म हे धार्मिक अथवा साक्षात्कारी नव्हते. त्याला सामाजिक परिमाणे होती. समाजाची सेवा, निसर्गाचे रक्षण, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्याची काळजी हे त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिगत त्याग व व्यक्तिगत विकास यातून समाजाच्या हिताचा व्यापक विचार त्यांनी मांडला होता. एकाही डोळ्यातून एकही अश्रू निघू नये, गरिबी, अन्याय, विषमता ...