प्रस्थापित जेव्हा विस्थापित होतात तेव्हा त्यांना मानाच्या जागी स्थापन करणार्यांची किती पंचाईत होते नां? सर्व जण कसे आंधळे झाले याची चर्चा मग सुरू होते. एके काळी एनरॉन कंपनीचा काय दबदबा होता. त्यांची प्रमुख भारतात आली की आपले सर्व राजकीय पुढारी त्यांना आवर्जून भेटत. काही तरी महत्वाची बोलणी होत. ते दृश्य सर्व चॅनेल न चुकता दिवसभर दाखवित असत. प्रत्यक्षात काय झाले तर एक दिवस ...