देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आशिया

तुम्ही काय फोडू शकता... शुक्रवार, ०४ फेब्रुवारी २०११, १७:१७ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

जर मी तुम्हाला विचारले की, तुम्ही काय फोडू शकता?
तर तुमचे उत्तर काय असेल.
फुगा, काच फार फार तर एखादा कप (दया दरवाजा फोडु शकतो, एखादा वीटही फोडु शकत असेल), ह्या आपल्या सारख्यांच्याच आवाक्यातील वस्तु.

आता सांगा हा कप "वर्ल्डकप" असेल तर :)

मग तुमचे उत्तर काय असेल.

हाच प्रश्न मला इतिहासात घेऊन गेला. पुलंच्या म्हणण्याप्रमाणे मी ह्या इतिहासात पक्का आहे.

एक नंबर शनिवार, ०७ ऑगस्ट २०१०, २१:३९ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

काल ऑफीसमध्ये तुषारशी जाम वाद झाला. ऑस्ट्रेलियाच जगात १ नंबर टीम आहे कारण त्यांचा खेळ त्या दर्जाचाच आहे आणि भारत १ नंबर आहे हा निव्वळ योगायोग आहे, हे तुषार चे मत.

बरेचदा आपण हे सहज मान्य करतो कारण आपल्याला सवय झाली आहे ती फक्त ऑस्ट्रेलिया कसोटी मध्ये उत्तुंग कामगिरी करतांना पाहायची. एक काळ होता जेव्हा ऑस्ट्रेलियाने मार्क टेलर, स्टीव्ह वॉ यांच्या नेतृत्वात खुप म्हणजे खुपच ...

अभिनंदन टीम ईंडिया... गुरुवार, २४ जून २०१०, २२:१५ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

१५ वर्षानंतर भारताने आशिया चषक जिंकला.
भारताने या स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले व विजयश्री मिळवली.
बांग्लादेश विरुद्ध सहज, पाकिस्तान विरुद्ध अतिशय चिकाटीने मिळालेल्या विजयानंतर श्रीलंकेसोबतची साखळी सामना भारत ...

पाच मंगळवार, २५ मे २०१०, ०२:२४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

पाच ह्या अंक बद्दल बोलाव तेवढे कमीच आहे. आणि माझ्या बाबतीत बोललं तर सगळया गोष्टीत पाच आहेच. माझ्या जन्म दिनांकात देखील शेवटी पाच, ज्या महिन्यात जन्म झाला तो महिना देखील पाच. जन्म वर्षातही शेवटी पाच. काय गम्मत आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकिटाच्या क्रमांकात देखील शेवटी पाच होते. आता काहीच घडवून आणलेलं नाही. माझा पहिला मोबाईल नंबरच्या शेवटी देखील पाच होते. सध्याला ...

गाव रविवार, २१ फेब्रुवारी २०१०, २३:५६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

नगर जिल्हातील वांबोरी नावच गाव आहे. या शनिवारी सकाळी शिवाजीनगरहून नगर बस पकडली. ‘विनाथांब’ बस होती. सहाच प्रवासी बसमध्ये. एक चालक, एक वाहक पकडून आठ. व्ही.आय.पी असल्याप्रमाणे वाटत होत. पुणे नगर महामार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. सव्वा दोन तासात नगरला. नगरहून ‘वांबोरी’ बस पकडली. घरी गेल्यावर नेहमी प्रमाणे ‘वीज’ नव्हती. संध्याकाळी माझ्या गावातील मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलो. ...

फयान नंतर शनिवार, २८ नोव्हेंबर २००९, ११:५७ (+०५:३०)

मराठी समुदाय

फयान नंतर

फयानने दक्षिण कोकणात धुमशाण घातले. काही भागात दोन आठवडे वीज नव्हती. तर काही भागात अजुन वीज नाही आहे. मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. जिवीतहानी मोठया प्रमाणावर झाली. पण आश्चर्य म्हणजे सरकारने योग्य मदत पुरवली नाही.अजुनही अनेक मच्छीमार बेपत्ता आहेत. त्यांचे मृतदेहही सापडले नाहीत. सुरवातीला तर सरकारी यंत्रणेने हे मृतदेह उचलण्यास नकार दिला होता. केवळ ...

शाहरुख खान सोमवार, १७ ऑगस्ट २००९, २०:५१ (+०५:३०)

मराठी समुदाय

शाहरुख खान यांचा जो अपमान एका अमेरीकन विमानतळावर झाला त्यावरुन बरेच वादळ निर्माण झाले होते. गेले दोन दिवस एकच विषय बऱ्याच वाहिन्यांनी चघळला असेल. अनेक ब्लॉगर्सनी तर शाहरुखलाच दोषी धरलय. म्हणे या विषयाचा खुपच बाउ केला गेला. अमेरीकन नागरीकाला इतर देशात अशी वागणूक मिळाली असती तर? अमेरीका गप्प बसल असत का? एका विशेष आडनावामुळे त्याला ही वागणूक दिली गेली आहे का ? हा एक वादाचा विषय आहे. ...

अखेरची लढाई सुरु शनिवार, ११ एप्रिल २००९, १०:२५ (+०५:३०)

मराठी समुदाय

अखेरची लढाई सुरु(Image from - http://www.welt.de/)

श्रीलंकन फौजेने आता उत्तर भागात प्रवेश केला आहे. हा उत्तरेकडील भाग नो फायर झोन म्हणून ओळखला जातो. या भागात ताज्या चकमकीत 30 ते 40 तमिळ टायगर मारले गेले आहेत. श्रीलंकन सेनेने आपली आक्रमक मोहीम कायम ठेवत उत्तर भागात धडक मारली आहे. नो फायर झोनच्या पलीकडे किमान 6000 तमिळ जनता अडकल्याची बातमी आहे. प्रचंड आंतरराष्ट्रीय दबावानंतर श्रीलंकन सेनेने ...

शांतीदूत शनिवार, १४ मार्च २००९, २२:१७ (+०५:३०)

मराठी समुदाय

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात अनेक कामांचा शुभारंभ झाला

श्रीलंकन खेळाडूंवर झालेल्या हल्ल्याची निंदा करावी तेवढी कमी आहे. कोणत्याही देशाचे खेळाडू हे शांतीदूत असतात.ते त्या देशाचे प्रतिनिधीत्व करत असतात, त्यांच्यावर असा भ्याड हल्ला करणे अतिरेक्यांनाच जमू शकते. हा क्रिकेटवरही ...

परदेशातील भारतीय सुरक्षित ? रविवार, १५ जून २००८, १३:०८ (+०५:३०)

मराठी समुदाय

परदेशातील भारतीय सुरक्षित ?

आजच्या घडीला लाखो भारतीय परदेशात जीवन जगत आहेत. काहींना इंग्रजांनी जबरदस्तीने गुलाम म्हणून नेले तर काही पोटापाण्यासाठी परदेशात गेले. काही परदेशातील पगार आणि राहणीमानाच्या आकर्षणाने गेले. हे सर्व आपलेच. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुध्द आपण आवाज उठविला पाहिजे. आजही भारतीय व्यक्ती या लोकांना भारताचे प्रथम दर्जाचे नागरीक मानत नाहीत. ...