शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रकृती सुधारून परत सक्रीय होत आहेत ही चांगली बातमी आहे. १ मेच्या कार्यक्रमातली त्यांची उपस्थिती शिवसैनिकांना नवी उमेद देवून गेली असणार यात शंकाच नाही. बाळासाहेबांनी काही विधान केले की गदारोळ उडालाच पाहिजे व माध्यमांना पुढचे काही दिवस मथळा काय द्यायचा याची काळजी करावी लागत नाही. “अमरनाथ यात्रेला अडथळा आणाल तर हज यात्रा बंद पाडू” किंवा ...