देवनागरी
Roman
Press F12 to toggle

परीक्षण

पाठिंबा सोमवार, ०६ मे २०१३, २०:२७ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

गेल्या महिन्यात नाटक मंडळींकडून धुरळा उडला कारण मंगेशकर कुटुंबियांना सध्या चालू असलेली नाटके काही आवडली नाहीत. तसे पाहायला गेलो तर मी देखील एक दोन वर्षात नाटक बघितले नसावे. शेवटले बघितलेले नाटक ’अवघा रंग एक झाला’ असावे. त्यावर एक टिपण टाकले असावे असे वाटते. ते नाटक तर आवडल्याचे आठवते. मुख्य कारण म्हणजे शास्त्रीय संगीतावर आधारित नाट्यसंगीत भरपूर होते. गाणारे ...

जागृती शुक्रवार, १६ नोव्हेंबर २०१२, १०:०८ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

मी कोण आहे आणि माझ्या आजूबाजूला काय घडते आहे याची माहिती करून घेण्याची जिज्ञासा बहुधा सर्वांना असतेच. ते जाणून घ्यायला भूगोल माहित असायला लागतो, इतिहास माहित असायला लागतो आणि या सर्वाची सांगड वर्तमानात घडणाऱ्या घटनांशी घालायला लागते.
त्या दृष्टीने नंदन निलेकणीने लिहिलेल्या Imagining India पुस्तकाबद्दल पूर्वी एक टिपण टाकले होते. निलेकणीने विविध ...

मुलगी झाली हो ! रविवार, १६ सप्टेंबर २०१२, २०:३० (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

पुन्हा तोच प्रकार. गेल्या टिपणात लिहिलेल्याचा पुन्हा एकदा अनुभव आला.

प्रसंग कांय सांगून येतो ? दर वर्षी एखादा चित्रपट मल्टीप्लेक्स मध्ये जाऊन बघतो. घरच्यांचा बरोबर. दोन वर्षांपूर्वी तारे जमींपर , त्या आधी black (गुगलला हा शब्द मराठीत माहित नाही हे लक्षात आले बरं ). त्याच सूत्रावर सुधारणा करत नवा चित्रपट 'बर्फी'. कलाकृती तशीच.

एक अपंग असला तर बरा. न ...

नटरंग - एक विसंवादी सूर शनिवार, २३ जानेवारी २०१०, ०८:४३ (+०५:३०)

Milind Phanse मुंगी उडाली आकाशी....अन्...

नटरंग हा चित्रपट मी काही दिवसांपूर्वी पाहिला. चित्रपट पाहात असतानाच हळूहळू अपेक्षाभंगाची भावना मनात दाटू लागली. आधी वाटलं की चित्रपटाच्या केलेल्या वारेमाप प्रसिद्धीमुळे माझ्याच अपेक्षा अवास्तव वाढल्या असाव्यात व म्हणून असे झाले असावे. त्यामुळे घाईत कुठेही प्रतिक्रिया नोंदवली नही. पण काही दिवस उलटून गेल्यानंतर, व शांतपणे विचार केल्यानंतरही मत न बदलल्यामुळे आता ते मांडत ...

ज्येष्ठ स्त्रियांकरिता आहार सोमवार, ०४ फेब्रुवारी २००८, ०७:३१ (+०५:३०)

manatala मनांतलं

वयाची साठी ओलांडली की शरीराच्या क्रिया मंदावतात. शारीरिक क्रिया मंदावल्यामुळे शरीराला आहाराची कमी गरज भासते. अशा वेळी आवश्‍यक तेवढाच पण संतुलित आहार घ्यायला हवा- जेणेकरून शरीराचं पोषण ...