The Ukimwi Road ह्या पुस्तकाविषयी लिहिण्यापूर्वी मनामध्ये विचार येऊन गेला की मराठीत अशा प्रकारचे लेखन कोणी केले आहे. अनिल अवचटांचे 'पूर्णिया' आणि नंतर सामाजिक प्रश्नांबाबत केलेल्या प्रवासांची वर्णने हे ठळकपणे आठवणारे उदाहरण. दि.बा.मोकाशी यांची 'अठरा लक्ष पावले' आणि 'पालखी', मिलिंद बोकील यांचे 'समुद्रापारचे समाज' ही मला आणखी आठवणारी उदाहरणे . हे लेखन वगळता ज्याला - दुसरा बरा शब्द आठवत ...