देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Maharashtra

यापुढे आंदोलकांवर प्लास्टिक गोळ्यांचा मारा मंगळवार, १७ जून २००८, १३:२६ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

आंदोलन आणि निदर्शनांच्या वेळी आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यापुढे पोलिसांकडून प्लास्टिक गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी मंत्रालयात पोलिस शस्त्र धोरणासंदर्भात ...

लोकसत्ताचे करणेच धाडसाचे! शुक्रवार, ३० मे २००८, १४:०१ (+०५:३०)

-- Batmidar

हल्ली जुलै महिन्याची २६ तारीख जवळ येऊ लागली की इथं मुंबईत आम्हांला धडकीच भरू लागते! पावसाची भीती नाही हो. पाऊस काय त्याला हवा तसा पडतो. आणि दरवेळी असा सणकून पडायला तो काय ठाण्यातला कॉंग्रेसचा उमेदवार आहे? तेव्हा भीती त्याची नाही. आम्हांला भय वाटते ते एकाच गोष्टीचे, की २६ जुलै आली रे आली की आमचे पेपरवाले आणि च्यानेलवाले गटारं, नाले आणि खड्ड्यांशिवाय काही बोलतच नाहीत! बोला रे! ...

चिअरगर्ल्सवर बंदीच हवी! रविवार, २७ एप्रिल २००८, १६:०० (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

चिअरगर्ल्स तोकडे कपडे घालून नृत्य करतात, हे भारतीय संस्कृतीला शोभत नाही, असे सांगत राज्यातील काही नेत्यांनी चिअरगर्ल्सवर बंदी घालण्याची मागणी केली. चिअरगर्ल्सवर बंदी घालण्याचा कायदा अजून तरी ...

अंबाजोगाई - अक्कलकोट- पंढरपुर - गाणगापुर शनिवार, २६ एप्रिल २००८, ००:२६ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

अंबाजोगाई - अक्कलकोट
हैद्राबाद वरुन एक-दोन दिवसाची ट्रिप साठि सोलापुर रोड च्या आजुबाजुची ठिकाणं म्हणजे.. लातुर च्या पुढे अंबेजोगाइ , अक्कलकोट- गाणगापुर आणि पंढरपुर अशी ड्रायविंग ट्रीप करण्यासारखी आहे.
ह्यातील अंबाजोगाई- अक्कलकोट हि ट्रीप एका दिवशी व पंढरपुर-गाणगापुर एका दिवशी अशी ट्रीप करण्याचा योग आला. इथे मी "ट्रीप केली" या ऐवेजी "योग आला" असं लिहितो त्याला कारण आहे. अनेकदा ...

शेगाव- घृष्णेश्वर- परळी वैजनाथ- ऑन्ढा नागनाथ शुक्रवार, २५ एप्रिल २००८, २३:०९ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

शेगाव चे गजानन महाराज ,अक्कलकोट चे स्वामी समर्थ आणि शिर्डी चे साईबाबा , हे तीन महापुरुष दत्तात्रेय अवतार मानले जातात.
शेगाव ला जाण्यासाठि महाराष्ट्रातुन सर्व शहरांतुन लक्झरी बसेस ची सोय आहे. हैद्राबाद-इन्दोर ए सी-लक्झरी-स्लीपर बस संध्याकाळी ७ ला हैद्राबाद हुन निघते ती पहाटे ५ पर्यंत खामगाव ला सोडते. चांगल्या प्रकारची रहाण्याची व्यवस्था ही खामगाव ला आहे. शेगाव खामगाव पासुन ...

भटकंती,भेटी आणी बरचकाहि शुक्रवार, २५ एप्रिल २००८, २२:२८ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

भटकंती,भेटी आणी बरचकाहि - ह्यात बरचकाहि म्हणजे काय ते मला अत्ता तरी माहित नाहि !
भटकंती करताना जे काहि अनुभव व आनंद मी घेतो त्यातील काहि वाचकांना मिळावा हि प्रामाणिक ईच्छा.
तसं तर आपलं आयुष्य म्हणजेच एक प्रकारची भटकंती असते पण येथे मी माझी भारतातील काहि ठिकाणांची भटकंती हि विशेषकरुन मांडणार आहे. ह्यात मुख्यतः खालिल ठिकाणांचा अनुभव असेल :
१. वाराणसी - काशी विश्वनाथ
२. ...

शिर्डी- भिमाशंकर- त्र्यंबकेश्वर शुक्रवार, २५ एप्रिल २००८, २२:१८ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

शिर्डी- भिमाशंकर- त्र्यंबकेश्वर
हैद्राबाद वरुन शिर्डी ला जाण्यासाठी ए पी टी डि सी ( आन्ध्र टुरीझम) च्या आणि इतर खाजगी अनेक सोयी आहेत. आन्ध्रप्रदेशात शिर्डी साई भक्तांची संख्या हि बरीच जास्त असते. रात्री चा प्रवास व दिवसा शिर्डी मुक्काम अशी व्यवस्था असते. एसी, नॉन्-एसी, स्लीपर अशा सर्व प्रकारच्या बसेस ची सोय आहे.
शुक्रवारी रात्री हैद्राबाद वरुन निघुन पहाटे पाच-सहा ला शिर्डी ला ...

सरकारी कामकाज आता मराठीतून शनिवार, १९ एप्रिल २००८, १३:४६ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

महाराष्ट्र दिनी सुरवात

मराठीला "राजभाषे'चा मान देणाऱ्या महाराष्ट्राच्या मंत्रालयातील मातृभाषेची अनेक वर्षांची उपेक्षा आता संपणार असून, सरकारी कागदपत्रांवर "मराठी'ची स्पष्ट मोहोर उमटण्याची ...

राज्यात 20 मे पासून गुटखा बंद सोमवार, १४ एप्रिल २००८, १३:२० (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

गोळा झाला 8 टन कचरा महाराष्ट्रात 20 मेपासून गुटखा बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारने पुन्हा घेतला आहे.

केंद्र सरकारने गुटखा बंद करण्याबाबत पाच फेब्रुवारी रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार राज्य सरकारने ...

महाराष्ट्रातले खलपुरूष - 1 : घाशीराम कोतवाल मंगळवार, १८ मार्च २००८, २१:४४ (+०५:३०)

visoba खट्टा-मिठा

रा. रा. विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाने महाराष्ट्रात इतिहास घडविला होता. हे नाटक ब्राह्मणविरोधी आहे, त्यातून पेशावाईतील ब्रह्मवृंदाची आणि त्यातही प्रामुख्याने नाना फडणीस यांची बदनामी झाली असल्याचे आरोप या नाटकावर झाले होते. त्यावर बंदी घालावी, अशी मागणी आणि त्यासाठी आंदोलनेही झाली होती. आज ते स‌र्व विरून गेले आहे.

मुळात तेंडुलकरांच्या नाटकाचा विषय ...