आटपाट नगर होते. तेथे एक सदासुखी नावाचा राजा राज्य करत होता. प्रजा मात्र बिचारी दु:खी, कष्टी नि वेगवेगळया संकटांना तोंड देत होती. हे थोडे झाले म्हणून कि काय त्या राज्यात सर्पांनी उच्छाद मांडला. सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या. लोक जीव मुठीत धरून जगू लागले. साप दिसला की, लोक जमा व्हायचे आणि दगड, काठी हाती मिळेल त्याने सापाला मारायचा प्रयत्न करायचे. साप कधी ...