सुर्य मावळताना मन हुरहुरते....
का?
ते आता समजले,
माझे माणुस ...
सुर्य मावळताना मन हुरहुरते....
का?
ते आता समजले,
माझे माणुस ...
प्रिय पाडगावकर विचारताहेत
कधीपासुन
सांगा कसं जगणार?
कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?
प्रश्न एकच
इथे जगतोय कोण?
यंत्रच तर आहेत सगळी रोजच्या नियमांची.
सण समारंभ गाठीभेटी या होत्या उत्साहाच्या गोष्टी
त्यांचेही रुपांतर ...
माझं दुःख घट्ट दाबुन धरलेमी
प्रयत्नपुर्वक
जाणिवपुर्वक
पण...
प्रत्येकवेळी आलं कुणीतरी
माझ्यावरच्या प्रेमापोटी किंवा सहानुभुती ही जगाची रित म्हणुनही
माझी जखम मात्र पुन्हा ओली झाली
त्यांचा हात पाठीवर पडल्यावर
आज सकाळपासुनच ढगाळ पावसाळी वातावरण होतं. काल पावसाने हलकासा शिडकावा केला होताच,त्यामुळे मनं सकाळपासुनच पावसाची वाट पहात होतं. कामं उरकता उरकता खिडकीतुन आभळाकडे पाहुन आढावा नकळतच घेतला जात होता.
आज पाऊस येणार
आज पाऊस येणार
आज आजुबाजुला पाहताना
मला फक्त कुंपण दिसतात
भली मोठी
मनाला लावलेली प्रत्येकाच्या.
ती तटबंदी लावुन सुखावतात हे लोक----
आता मी सुरक्षित (?) आहे
'मी'पणाला चिकटुन बसतात
त्या पिंजऱ्यात
स्वताच लावलेल्या कुंपणाच्या.
अश्रु
मनातलं काहुर
डोक्यातलं काहुर
तुंबळ युद्ध वा नुसतीच हुरहुर
डोळ्यांना चाहुल
फुटे अश्रुंना पाउल
नुसतेच साश्रु नयन
तर कधी मुक ओघळ
कधी मात्र फुटे बांध
त्यंचा जणु महापुर
सामावुन घेतात
दुखांचा सागर