माझा ब्लॊग
जेष्ठ व ख्यातनाम लेखक श्री विजय तेंडुलकर यांचे नुकतेच निधन झाले.निर्भिड आणि निर्भय असा एक लेखक आपल्यातुन निघून गेला ही फारच दुखाःची गोष्ट आहे.
ह्या ना त्या कारणाने तेंडुलकर, त्यांचे लिखाण व त्यांची भुमिका सतत वादग्रस्त राहीली.माणसांमधला हिंसकपणा,क्रौर्य व लैंगिकता असे पठडीबाहेरचे विषय तेंडुलकरांनी लेखनासाठी निवडले.भल्याभल्यांनी त्यांच्यावर विकृतपणाचा आरोप केला.