देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अण्णांची पत्रे.

जडातून सूक्ष्माकडे गुरुवार, २५ डिसेंबर २००८, १४:०५ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

जडातून सूक्ष्माकडे

:

भगवंताचा साक्षात्कार नित्यनवा आहे, First hand आहे, second hand नव्हे. सर्व सामान्यतः सेकंड हँड देवच लोकांना माहीत आहे, असतो. दुसर्‍यांच्या अनुभवावरून आपण देवाची कल्पना करत असतो. 'उपनिषदांत असे सांगितले आहे", "गीतेत तसे सांगितले आहे" हेच सर्वसामान्यपणे बोलतात, बोलले जाते. अर्जुनाने विश्वरूपाचे वर्णन केले. आपण अनुभवलेल्या विश्वरूपाचे त्याने वर्ण न ...

उद्धरेत्‌ आत्मनात्मानं गुरुवार, १८ डिसेंबर २००८, १०:१३ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

उद्धरेत्‌ आत्मनात्मानं

देवकार्य, धर्मकार्य वा समाजकार्य यात "मम" म्हणणर्‍यांचा वाटा मोठा असतो, पण "मम"च्या जागी "इदं न मम" अशा भूमिकेवर येणं हे फार मोठं सौभाग्य, महत्‌भाग्य. श्रीगुरुज्ञानोबारायांनी dichotomisingचा, अध्यात्मातील अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत अनुभवांतून, आपल्या साहित्यांत जागोजागी मांडला आहे. म्हणजे एक आत्मारामच स्वतः आपल्याला आपल्यातच विभागून ...

रसो वै सः सोमवार, १५ डिसेंबर २००८, १०:४७ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

रसो वै सः: तुकोबाराय भक्ताचार्य. निर्व्याज, निरंजन, दिव्य अशी भक्ति कशी प्राप्त करावयाची ? तर भक्ति म्हणजे खरोखरी अगदी नवीन, वेगळे असे काहीच करावयाचे नाही. फक्त आपल्या अंतःकरणाचे सर्वभाव आणि विचार हे एका भगवंताकडे वळवायचे. असं सर्वभावांनी, सर्वस्वी त्याच्याशी लगटून, त्याचेच होऊन राहणे हीच मंगलभक्ति.
अशी ही भक्ति परमप्रेमस्वरूप तर आहेच, पण ...

वृक्ष नामबीजाचा शनिवार, १३ डिसेंबर २००८, ०९:४३ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

वृक्ष नामबीजाचा .
परमार्थात सद्‍गुरूंची किती आवश्यकता आहे ते उपनिषदांपासून ज्ञानेश्वरमहाराज तुकोबारायांपर्यंत सार्‍यांनी एकमुखाने सांगितले आहे. आत्मज्ञान हे अत्यंत गहन असल्यामुळे (राजविद्या राजगुह्यं) ते केवळ स्वतःच्या बुद्धिबळावर प्राप्त होणे शक्य नाही. त्यासाठी ज्याने ते करून घेतले आहे, अशा आत्मज्ञानी श्रीगुरूची मोठी आवश्यकता आहे. कठोपनिषदांत ...

अमला भक्ति गुरुवार, ११ डिसेंबर २००८, १४:५९ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

अमला भक्तिश्रीगुरुजवळ काय मागावे तर "अवीट पदपद्माची अमला भक्ति दे मला." हे सद्‌गुरुराया, तुझ्या पदकमली रमून जाणारी, अवीट गोडी असलेली, अशी ती अमला भक्ति तेवढी मला द्या. अमला भक्ति = शुद्धभक्ति, परमश्रेष्ठ भक्ति असाच तिचा अर्थ आहे. अशी ही अमला भक्ति भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. ज्याचे मन, बुद्धी, काया, आणि वाचा पूर्ण शुद्ध झालेली असते, जो आनंद, ...

आसक्ति - आनंदकंदाची गुरुवार, ३१ जुलै २००८, १३:१० (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

आसक्ति - आनंदकंदाची

आपल्या हृदयातील भक्तिप्रेम भावनेचा परमोच्च भाव म्हणजेच एकांतभक्ति होय. हिलाच कोणी अद्वैतभक्ति अथवा पराभक्ति असेही म्हणतात. अशी भक्ति करता करता मग भक्ताला सर्व लौकिक सुखे, सुखकल्पना व जीवनव्यवहार नीरस वाटू लागतो. एका भगवंतावाचून दुसरे काहीही आवडेनासे होते. भक्त मग आपला सर्व जीव प्राण एकवटून हरि प्राप्तीसाठी झटतो, तळमळतो. जरा एक ...

तुझा विसर न व्हावा. शनिवार, १२ जुलै २००८, २१:०७ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

तुझा विसर न व्हावा. भक्ति म्हणजे भगवंताविषयी परमप्रेम भाव. ही भक्तिप्रेमभावना मोठी उत्कट हवी. अखंड आणि क्षण प्रतिक्षण वर्धमान होत जाणारी अशी 'भक्तिप्रेम भावधारा' असली पाहिजे. थोडासा भाव, थोडेसेच पूजन, भजन , वाचन, श्रवण एवढ्याने भागत नाही. तर मग किती हवा तो भाव ? तर सर्वच्या सर्व अंतःकरणच या भक्तिप्रेम भावाने अंतर्बाह्य व्यापून गेले पाहिजे. आणि त्याच बरोबर आपले ...

अनंत रूपें अनंत वेषें रविवार, ०६ जुलै २००८, ०४:२१ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

अनंत रूपें अनंत वेषें
ज्ञानदेवादि सगळे भागवत सांप्रदायातील वैष्णव हे बहुतांशी अद्वैती आहेत. त्यांना सगुणाचे प्रेम आहे व निर्गुणाचे ज्ञान आहे. सगुण आणि निर्गुण एकच आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे व अनुभव पण आहे.
चराचर सृष्टिला व्यापून असणार्‍या चेतन तत्त्वावर/चैतन्यावर त्यांची नितांत निष्ठा आहे. या चेतन तत्त्वालाच प्राचीन तत्त्ववेत्यांनी ब्रह्म, ...

"मी" कोण ? शनिवार, ०५ जुलै २००८, २१:११ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

"मी" कोण ?

आपल्या सर्वांच्या ठिकाणी "मी" म्हणून जे स्फुरण होते, त्यालाच शास्त्रकार जीव असे म्हणतात. या जीवाला "मी म्हणजे कोण" हे यथार्थ समजत नाही. "मी" म्हणजे देहस्वरूप, कर्मकर्ता, सुख-दुःखवादी फलभोक्ता, अज्ञानी, अपूर्ण, शब्दादी (विषय) भोगावर ज्याचे सुख अवलंबून आहे असा, जन्म-मरण भोगणारा, असे आपल्याला समजत असतो. त्याचे हे सर्वच ज्ञान विपरीत असून स्व-स्वरूपाचा यथार्थ ...

आचार्य आणि संत शनिवार, ०५ जुलै २००८, २०:५५ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

आचार्य आणि संत

संतांनी समाजाला धर्म, तत्त्वज्ञान आणि परमार्थ शिकविण्यासाठी वर्णप्राधान्य, आश्रमप्राधान्य इतकंच नाही तर वेषप्राधान्य ह्याला गौणत्व दिले. त्याचे पूर्ण खंडनही केले नाही, तसाच त्याचा आग्रहही धरला नाही. वेदमार्गाला कुठेही यत्‍किंचित बाध येऊं न देता, त्यांनी समाज आणि परमार्थाचे प्रबोधन करणारे आचार्यपद यांतील अंतर कमी केले.
आचार्यांनी समाज ...